आपल्याच मालकीच्या शेतजमिनींवर पेरणी करण्यास मज्जाव केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कल्याण-मलंगगड रस्ता रोखून धरला. शिवाय टायर जाळून मलंगगडाकडे जाणारा मुख्य रस्ता बंद केला. इतकंच नाही तर पोलिसांवर दगडफेकही केली.
ब्रिटीश काळात दुसऱ्या महायुद्धात लष्कराने नेवाळे गावाजवळ धावपट्टीसाठी जागा घेतली होती. मात्र त्यानंतर ती जागा शेतकऱ्यांच्या ताब्यात आली होती. परंतु यावर्षी पुन्हा नौदलाने या जागेवर दावा करत तिथे कम्पाऊंड टाकायला सुरुवात केली आहे. याला या शेतकऱ्यांनी विरोध केला आहे
जवळपास या भागातील 7 ते 8 गावांची जमिनी ताब्यात घेतली आहे.