याबाबतची माहिती जलसंपदा खात्याचे प्रधान सचिव आय. एस. चहल यांनी बुधवारी दिली.
राज्यभरातील जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंत्यांची 1300 जागा रिक्त आहेत. या जागांच्या भरतीबाबत न्यायालयात सुनावणी सुरु आहे. याबाबतचा निकाल येत्या दोन-चार दिवसात येण्याचा अंदाज आहे. त्यानंतर तातडीने याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, असं चहल यांनी सांगितलं.