लातूरमध्ये आयोजित सभेत ओवेसी बोलत होते. लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर एमआयएम, महाराष्ट्र विकास आघाडी, शेतकरी संघटना यांनी एकत्र येत परिवर्तन आघाडी स्थापन केली आहे.
भारतात हजारो जाती धर्माचे लोक राहतात. भारतासारखं राष्ट्र जगात कुठेही मिळणार नाही. त्यामुळे भारताला एका धर्माचं राष्ट्र कधीच होऊ देणार नाही, असं म्हणत ओवेसींनी भाजपवर निशाणा साधला.