मुंबई: मुंबईसह दहा महापालिकेतील चित्र आता स्पष्ट झालं आहे. मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या महापालिकेत उमेदवारांची मोठी संख्या पाहायला मिळतेय.


मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीतील 227 जागांसाठी एकूण 2 हजार 267 उमेदवार रिंगणात आहेत. शेवटच्या दिवशी एकूण 367 जणांनी आपले अर्ज मागे घेतले.

ठाणे – ठाण्यात 33 प्रभागांतील 131 जागांसाठी 805 उमेदवार. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 228 जणांनी माघार घेतली.

उल्हासनगर – उल्हासनगरात 78 जागेसाठी 479 उमेदवार रिंगणात आहेत. शेवटच्या दिवशी तब्बल 79 उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला.

पुणे – 2664 उमेदवारांपैकी 751 जणांनी माघार घेतली, तर 418 जणांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत. त्यामुळे आता 162 जागांसाठी 1076 उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पिंपरी-चिंचवड – महापालिका उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 128 जागांसाठी 1238 उमेदवारांपैकी 480 जणांनी माघार घेतली असून, 758 उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत.

सोलापूर –. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी  259 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे मनपाच्या 102 जागांसाठी 743 उमेदवार रिंगणात आहेत.

नाशिक – मनपा निवडणुकीत 461 उमेदवारांनी माघार घेतली असून, आता 122 जागांसाठी 821 उमेदवार रिंगणात आहेत.

 नागपूर – महापालिकेच्या 151 जागांसाठी 12 झोनमधून 1813 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले होते. यातील 433 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली असून, आता 1141 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.

अकोला – महापालिका निवडणुकीच्या रिंगणात 579 उमेदवार आहेत. उमेदवारी परत घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 157 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. एकूण दाखल 881 अर्जांपैकी 145 अर्ज छाननीत बाद झाले. उरलेल्या 736 पैकी 157 उमेदवारांनी घेतले उमेदवारी अर्ज परत. त्यामुळे 80 जागांसाठी 579 उमेदवार रिंगणात आहेत.

अमरावतीअमरावती महानगरपालिकेच्या 87 जागांसाठी 785 अर्ज आले होते. त्यापैकी 80 जणांनी अर्ज मागे घेतले.  आता 648 उमेदवार रिंगणात आहेत.