याचवेळी त्यांनी राम मंदिराचाही विषय उपस्थित केला. ‘राम मंदिरासाठीच आपला जन्म झाला आहे.’ असं त्या यावेळी म्हणाल्या. ‘आधीचं सरकार राम मंदिराला विसरलं आणि केवळ निवडणुकासाठी मंदिरात गेले.’ असं म्हणतं त्यांनी काँग्रेसच्या कारभारावर टीका केली.
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी काही गंभीर आरोपही केले. 'तुरुंगात असताना आपली आणि आपल्या वकिलांना मारण्याची सुपारी पाकिस्तानातून देण्यात आली होती.' असा दावाही त्यांनी यावेळी केला.
‘भगव्याला बदनाम करण्यासाठी मला जेल मध्ये टाकलं, हे मोठं षड्यंत्र होतं. एका स्त्रीला, एका संन्यासीला त्रास दिला. भारताच्या भगव्याला दहशतवादी घोषित करणे हे षड्यंत्र होतं, मात्र भगवा प्रखर आहे.’ असंही त्या यावेळी म्हणाल्या.