देशभरात 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या नेट परीक्षेसाठी जालन्यामधील तुकाराम पिठोरे आणि पूजा काकड यांनी फॉर्म भरला होता. ज्यात त्यांनी महाराष्ट्रातील औरंगाबाद, नाशिक, नांदेड व परभणी या चार शहरांची पर्यायी निवड केली होती. मात्र महाराष्ट्रातील शहरांचे पर्याय दिले असताना या विद्यार्थ्यांना थेट बिहारमधील औरंगाबाद येथील परिक्षा केंद्र दिल्याने परीक्षा देण्याविषयी त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
मानव संसाधन मंत्रालय व यूजीसीकडे या विद्यार्थ्यांनी मेल द्वारे आपली तक्रार नोंदवली असली तरी त्यासंबंधी अजून पर्यंत दखल घेण्यात आलेली नाही.