देशभरात सध्या अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आहे. शिवाय, देशद्रोही शक्तींचा समाना करण्याचं आव्हानही देशासमोर आहे. मात्र, असे असतानाही देशातील कुणा घटकाला दोषी मानून चालणार नाही, याचं उदाहरण म्हणजे अक्कलकुवामधील जामिया संस्था. धार्मिक शिक्षण आणि व्यवसायिक शिक्षणा यांचा मेळ घालणाऱ्या अक्कलकुवातील जामिया संस्थेच्या आवारात यंदा 15 हजार विद्यार्थ्यांनी ध्वजारोहण करत देशात भक्ती आणि एकतेचा संदेश दिला.
विविधतेत एकता असणारा आपला भारत देश आहे. याच विविधतेतील एकतेचा प्रत्यय आज अक्कलकुवात आला. जामिया मदरशातील ध्वजारोहणाचा कार्यक्रम नक्कीच देशातील अनेकांना महत्त्वाचा संदेश देणारा ठरेल, यात शंका नाही.