जखमींना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल (सोमवार) रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. मुळचे औरंगाबादचे असलेले रहिवासी चांदा गावात साखरपुड्यासाठी गेले होते. तिथून परतत असताना ही घटना घडली.
या रिक्षातून एकूण पाच जण प्रवास करत होते. यामधील नमीरा शफीक कुरेशी आणि महेवीश आतीक कुरेशी आणि जुनेद शफीक कुरेशी या तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर समीर हनीफ कुरेशी, रफीक हाजी जाफर कुरेशी, हे यात गंभीर जखमी झाले आहेत.