चंद्रपूर : काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे यांच्यावर खंडणी वसूल केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.


पती-पत्नीच्या एका कौटुंबिक वादात प्रकरण मिटविण्यासाठी पोलिसांना पैसे द्यावे लागतात असं सांगून अश्विनी खोब्रागडे यांनी पीडित महिलेकडून १२ हजार रुपये उकळले. फिर्यादी महिलेने अश्विनी खोब्रागडे यांना ५ हजार दिले. मात्र, कौटुंबिक वादाचे हे प्रकरण मिटत नसल्यामुळे तिने पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांच्याकडे तक्रार केली.

पती-पत्नीतील वाद मिटविण्यासाठी पोलिसांना पैसे द्यावे लागतात हे ऐकून पोलीस अधीक्षकांना देखील धक्का बसला आणि त्यांनी तक्रारीची शहानिशा करण्यासाठी ट्रॅप लावला. त्याप्रमाणे काल रात्री अश्विनी खोब्रागडे यांना ७ हजारांची लाच घेताना त्यांच्या घरीच रंगेहाथ पकडण्यात आलं. याप्रकरणी अश्विनी खोब्रागडेंवर खंडणी वसूल केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

VIDEO :