सांगलीतील चांदोली धरण क्षेत्राच्या परिसरात भूकंपाचा केंद्र असल्याची माहिती मिळते आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली, तर कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत भूकंपाचे धक्के जाणवले.
दरम्यान, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शिवाय, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याकील सर्व धरणं सुरक्षित आहेत.