महाराष्ट्र-गुजरातचा सीमाभाग भूकंपाने हादरला
एबीपी माझा वेब टीम | 21 Apr 2018 06:27 PM (IST)
महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमाभागात दुपारच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसले. भूकंपाची तीव्रता 3. 7 रिश्टर स्केल असल्याची माहिती मिळत आहे. तसेच, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नंदुरबार : महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमाभागात दुपारच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसले. भूकंपाची तीव्रता 3. 7 रिश्टर स्केल असल्याची माहिती मिळत आहे. तसेच, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुपारी 5 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे सर्वाधिक धक्के गुजरातच्या सूरतमधील नवसारी, तापी वलसाड आदी भागात जाणवले. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. तर महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील नंदुरबार जिल्ह्यातही भूकंपाचे हलके धक्के जाणवले.