औरंगाबाद: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज औरंगाबादच्या (Aurangabad) दौऱ्यावर येणार असून, महाआरोग्य शिबिराला ते हजेरी लावणार आहेत. फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे (Maha Arogya Camp) आयोजन करण्यात आले असून, याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. औरंगाबाद शहरातील रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या अयोध्या मैदानावर या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर यासाठी फडणवीस हे आज शहरात येणार आहेत. साडेदहा वाजता फडणवीस यांचे शहरात आगमन होणार आहे. 


असा असणार फडणवीसांचा दौरा.. 



  • सकाळी 9 वाजता: मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, (गेट नं. 8), मुंबईकडे प्रयाण

  • सकाळी 9.25 वाजता: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, (गेट नं. 8), मुंबई येथे आगमन

  • सकाळी 9.30 वाजता:  VT-TRI या विमानाने औरंगाबादकडे प्रयाण

  • सकाळी 10.10 वाजता: औरंगाबाद विमानतळ येथे आगमन

  • सकाळी 10.15 वाजता: मोटारीने अयोध्या मैदान, आर.टी.ओ. कार्यालयासमोर, रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबादकडे प्रयाण

  • सकाळी 10.30 वाजता: अयोध्या मैदान, आर. टी. ओ. कार्यालयासमोर, रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद येथे आगमन

  • सकाळी 10.30 वाजता: महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन समारंभ

  • सकाळी 11.30 वाजता: मोटारीने औरंगाबादकडे विमानतळ प्रयाण

  • सकाळी 11.45 वाजता: औरंगाबाद विमानतळ येथे आगमन

  • सकाळी 11.50 वाजता: VT-TRI या विमानाने सोलापूरकडे प्रयाण


जिल्हाधिकारी यांनी घेतली बैठक... 


दरम्यान, औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराच्या अनुषंगाने प्रशासनकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी बैठक देखील घेतली आहे. या शिबिरामध्ये वाहतुक, स्वच्छतागृह, भोजन, आसन व्यवस्था येणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी नेमुन दिलेल्या जबाबदाऱ्या योग्य रितीने पार पाडून गरजुंना महाआरोग्य शिबिरातुन सुविधेचा लाभ द्यावा, असे निर्देश आरोग्य यंत्रणा व संबंधिताला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना दिले. 


असे असणार नियोजन...


आरोग्य सर्वेक्षण केल्यानंतर विविध तपासण्या आणि उपचार करण्यासाठी आरोग्य शिबिरात व्यवस्था करण्यात येणार आहेत. यासाठी सर्व सुविधांचा आढावा, जिल्हाधिकारी यांनी घेतला. एमआयडीसी, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विद्यार्थी, स्वयंसेवक, होमगार्ड, पोलीस, आरोग्य कर्मचारी याबरोबरच संबंधित विभागाना पाण्डेय यांनी सुचना केल्या. महानगरपालिका, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनांच्या समन्वयातून महाआरोग्य शिबिराची यशस्वी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी संबंधित यंत्रणेला दिले. तर या शिबिरात डॉक्टर, नर्स आणि आशासेविका यांचा समावेश असणार आहे. महानगरपालिकेचा आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा, खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षण घेत असलेले विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या: 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बळजबरीने रुग्णालयात पाठवणार; संजय शिरसाट असे का म्हणाले?