मुंबई : राज्यातील विविध 25 जिल्ह्यांमधील 654 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 33 जिल्ह्यांतील सुमारे 2 हजार 812 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 771 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची घोषणा झाली आहे. 27 मे 2018 रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांसाठी 7 ते 12 मे 2018 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जातील. त्यांची छाननी 14 मे 2018 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 16 मे 2018 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल. मतदान 27 मे 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 28 मे 2018 रोजी होईल. सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या :
  • ठाणे- 5
  • पालघर- 3
  • रायगड- 187
  • सिंधुदुर्ग- 2
  • नाशिक- 20
  • धुळे- 7
  • जळगाव- 8
  • अहमदगनर- 77
  • पुणे- 90
  • सोलापूर- 3
  • सातारा- 23
  • सांगली- 82
  • कोल्हापूर- 74
  • औरंगाबाद- 4
  • बीड- 2
  • नांदेड- 7
  • परभणी- 1
  • उस्मानाबाद- 3
  • लातूर- 5
  • अकोला- 2
  • यवतमाळ- 29
  • वर्धा- 14
  • भंडारा- 4
  • गडचिरोली- 2
  • एकूण- 654
पोटनिवडणूक होणाऱ्या रिक्तपदांची जिल्हानिहाय संख्या (कंसात ग्रामपंचायतींची संख्या) :
  • ठाणे (90)- 167
  • पालघर (73)- 144
  • रायगड (93)- 158
  • रत्नगिरी (202)- 299
  • सिंधुदुर्ग (74)- 104
  • नाशिक (200)- 318
  • धुळे (34)- 49
  • जळगाव (57)- 96
  • नंदुरबार (32)- 36
  • अहमदगनर (78)- 124
  • पुणे (258)- 456
  • सोलापूर (93)- 154
  • सातारा (409)- 777
  • सांगली (40)- 81
  • कोल्हापूर (87)- 126
  • औरंगाबाद (34)- 41
  • बीड (24)- 35
  • नांदेड (106)- 177
  • परभणी (28)- 40
  • उस्मानाबाद (48)- 65
  • जालना (21)- 28
  • लातूर (79)- 94
  • हिंगोली (41)- 55
  • अमरावती (80)- 121
  • अकोला (23)- 31
  • यवतमाळ (110)- 167
  • वाशीम (20)- 23
  • बुलडाणा (39)- 72
  • वर्धा (49)- 72
  • चंद्रपूर (74)- 106
  • भंडारा (6)- 48
  • गोंदिया (35)- 43
  • गडचिरोली (175)- 464
  • एकूण (2,812)- 4,771