मुंबई : गेल्या चार दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा राज्यात रोज नवा उच्चाक स्थापित होत आहे. प्रत्येक दिवशी नवीन रुग्णांची संख्या हजारोंच्या पटीने वाढतच आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने परिस्थिती चिंताजनक झाली आहे. मृतांचा आकडा वाढला आहे. सध्या उपलब्ध परिस्थितीत, आहे त्या साधनसामुग्रीत आरोग्य व्यवस्था काम करत आहे. मात्र, रुग्णसंख्याच इतकी झपाट्याने वाढत आहे की त्या व्यवस्थेसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलंय. त्यामुळे राज्यात अनेक तालुक्यात जनता कर्फ्यू घेण्यात येत आहेत.


राज्यात रविवारी रुग्णवाढीचा नवा विक्रम नोंदविण्यात आला. एका दिवसात 23,350 रुग्णांची नोंद करण्यात आली. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण, विभागातर्फे देशातील 35 जिल्ह्यांना कोरोना व्यवस्थापनाच्या अनुषंगाने काही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. या 35 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अधिक प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे, चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासारख्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकारावरून महाराष्ट्राची परिस्थिती दिवसेंदिवस नाजूक होत चालली आहे.


अनेक जिल्ह्यासह तालुक्यात जनता कर्फ्यू


काही महिन्याअगोदर ग्रीन झोनमध्ये असलेला वाशीम जिल्ह्यामध्ये 2163 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण संख्या रिसोड शहर परिसरात आढळत असल्याने खबरदारीचे उपाय म्हणून व्यापारी मंडळाने रिसोड शहरात 4 दिवस जनता कर्फ्यू घोषित केला होता. आज रिसोड शहर बंदचा तिसरा दिवस आहे, तर जनता कर्फ्यू संपल्यानंतर सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकान सुरु राहणार असल्याचा निर्णय व्यापाऱ्याने घेतला आहे.


कोरोनाचा विळखा लक्षात घेता बारामतीत पुन्हा जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली. आजपासून या लॉकडाऊनला सुरुवात करण्यात आलीय. मध्यरात्री 1 वाजल्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येतेय. मागील पाच दिवसामध्ये 500 हून अधिक जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. बारामती शहर व तालुक्यात सध्या दीड हजाराच्या आसपास कोरोना ग्रस्तांची संख्या झाली असून 48 लोक कोरोनामुळे मृत पावले आहेत.


राज्यातील आयुर्वेदिक निवासी डॉक्टर्सना 5 महिन्यांपासून विद्या वेतन नाही, डॉक्टर आंदोलनाच्या तयारीत


कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने रविवारचा जनता कर्फ्यू कायम ठेवला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने नंदुरबार शहरातील आणि जिल्ह्यातील व्यवहारांना सायंकाळी सात वाजेपर्यंत परवानगी दिली असताना रविवारचा जनता कर्फ्यू मागे घेण्यात येईल अशी अपेक्षा नागरिक आणि आणि व्यापाऱ्यांना होती. मात्र, जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने नंदुरबार मधील जनता कर्फ्यू कायम ठेवला आहे.


सांगलीत वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता केंद्राकडून परवानगी घेऊन जिल्ह्यात 14 दिवसांचा लॉकडाऊन करण्याची व्यापाऱ्यांची मागणी आज जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्याकडे करणार आहेत.


पंढरपूर, मंगळवेढा शहरात आजपासून 22 सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यु पाळला जाणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतली दुकानं सुरू रहाणार आहेत.


Nagpur Corona | पोलिसांना बेड्स का मिळत नाही? नागपूरच्या पोलीस आयुक्तांचा झोनल अधिकाऱ्यांना सवाल