सांगली : सांगली जिल्ह्यात रविवारी रात्री मुसळधार पाऊस झालाय. यामुळे कडेगाव,खानापूर आणि कवठेमहांकाळ याठिकाणी नद्यांना पूर येऊन पूल पाण्याखाली गेले आहेत. आटपाडीच्या पुलावरुन देखील रात्रीच्या सुमारास पाणी आले होते. तर कडेगावच्या अमरापूर येथील नांदनी नदीला पूर आल्याने एक पूल वाहून गेल्याची घटना घडली असून, या मार्गावरील कराड - कडेगाव वाहतूक काही काळ बंद झाली. नंतर पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली.


सांगली शहरासह जिल्ह्यात रविवारी रात्री नंतर मुसळधार पाऊस पडला. पहाटे पर्यंत पडलेल्या या पाऊसामुळे जिल्ह्यातील कडेगाव आणि खानापूर व कवठेमहांकाळ या दुष्काळी पट्टयातील नद्यांना पूर आला आहे. कडेगाव तालुक्यातील येरळा आणि नांदनी नदीला पूर येऊन तीन पूल पाण्याखाली गेले आहेत.ज्यामध्ये आसद-चिंचणी रोडवरील पूल,चिखली येथील नांदनी नदीवरील खेराडे-चिखली पूल आणि येरळा नदीवर असणारा कमळापूर-रामापूर पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच सोनहीरा येथील ओढ्यासही पूर आला आहे.तर कडेगाव तालुक्यातील अमरापूर येथील नांदनी नदीला आलेल्या पूरामुळे कराड -विटा मार्गावरील एक पूल वाहून गेला आहे.त्यामुळे याठिकाणची वाहतूक काही काळ बंद होती. नंतर पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू झाली. खानापूर तालुक्यातही मुसळधार पाऊसामुळे येरळा नदीला पूर आल्याने भाळवणी येथील शिरगाव-भाळवणी पुल पाण्या खाली गेला आहे.त्यामुळे याठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती.


तसेच कवठेमहांकाळ तालुक्यात रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली.त्यामुळे देशिंग मार्गावर असणाऱ्या मोरगाव गावातील अग्रणी नदीवर असणाऱ्या पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्याचबरोबर मुसळधार पाऊसाने तालुक्यातील नदी, नाले तुडुंब भरले आहेत.


Gadchiroli | नक्षलग्रस्त भागात पहिला पुल कम बंधारा; 10 गावांना सिंचनाचा फायदा होणार