मुंबई : कोरोनामुळे बळीराजा खूप अडचणीत सापडला आहे. सध्या शेतकऱ्यांची स्थिती बिकट आहे. त्यामुळं त्यांना पीक कर्जाची परतफेड शक्य नाही. यासाठी सरकारने पीक कर्जाचे पुढील चार ते पाच वर्षासाठी हफ्ते पाडून द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. आज शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी कमेंटबॉक्समध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरं देखी दिली.


यावेळी पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या पीक कर्जाला 4-5 वर्षाचे हप्ते पाडून द्या. तसेच मोफत धान्य देताना शेतकऱ्यांकडे असलेला शेतमाल विकत घेण्याबाबत विचार करावा. शेतकरी अडचणीत सापडला आहे, शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला यामुळे मोठा फटका बसला आहे, असं शरद पवार म्हणाले.

Coronavirus | रेपो रेटमध्ये मोठी कपात, EMI तीन महिने स्थगित करण्याचा आरबीआयचा सल्ला

ते म्हणाले की, कोरोनाचा मानवांसह पशूपक्ष्यांवरही परिणाम झाला आहे. सरकार याबाबत काही सूचना देत आहे. सरकारचं काम चांगल्या पद्धतीनं सुरु आहे. या सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष कराल तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असंही शरद पवार म्हणाले.

Coronavirus Full Updates | देशभरात कोरोनाचा गुणाकार सुरु, राज्यात 136 कोरोनाबाधित

शरद पवार म्हणाले की, जेवढ्या कंपन्यात कामगार काम करतात, त्या कंपनी मालकांनी कामगारांना जपावं, त्यांच्या वेतनाची खबरदारी घ्यावी. कोरोनाशी लढण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार, खासदार एका महिन्याचे वेतन देणार असल्याचे देखील पवारांनी घोषित केले. सध्याच्या परिस्थितीत नागरिकांकडून शिस्तीची गरज आहे. मात्र पोलिसांनी देखील सामंजस्यानं वागावं, असं शरद पवार म्हणाले.

कोरोनाचा सामना करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार, केंद्र सरकार, राष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय संघटना यांनी अनेक चांगले निर्णय तातडीने घेतले आहेत. कोरोनाचं संकट अत्यंत गंभीर आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं, देशातील अर्थव्यवस्थेवर याचा गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम होणार आहे यात काहीही शंका नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं.

पवार म्हणाले की, अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना अडवू नका. संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी सर्व शक्ती वापरा असंही पवार म्हणाले. द्राक्षं आणि आंबा उत्पादकांना सरकारने मदत करावी असंही आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. ईएमआयबाबत सरकारने विचार करावा, फळबागांच्या नुकसानीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, असंही ते म्हणाले.