महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळी सुजलाम सुफलाम महाराष्ट्राचं स्वप्न सर्वांनीच पाहिलं होतं. त्याच दिशेनं सरकार काम करणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
विदर्भावर आघाडी सरकारकडून अन्याय झाला असं सांगत, तो अन्याय आपण दूर करत असून, मुंबई आणि नागपूरला रस्ते मार्गानं जोडणार, तसंच मुंबईतल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मेट्रोचं मुंबईत जाळं उभारणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.
मुंबईत सामान्य माणसाला परवडणारी 11 लाख घरं पंतप्रधान गृहनिर्माण योजनेतून घर देणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.