सोलापूर : शिवसेनेत हिंमत असेल तर पुन्हा महाराष्ट्र विधानसभा निवडणुक झाली तर शिवसेनेने निवडणुक एकटी लढवून दाखवावी असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील बोलत होते. या वेळी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा देखील साधला.
दिल्ली निवडणुकांवरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्रातून मधून भाजपवर टीका करण्यात आली आहे. याला प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले, आप मतलबी कोण हे जेव्हा निवडणूक लागतील तेव्हा कळेलच. सूर्यावर थुंकण्याला काही अर्थ आहे. तर दिल्ली निवडणुकांबद्दल देखील चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. जणू काय आपण जिंकल्याचा अविर्भावात शरद पवार आणि उद्धव ठाकरे बोलत आहेत. त्यांच्या पक्षाला 0.2% आणि 0.1% मते मिळाली असून भाजपला मात्र 6 टक्के मते जास्त मिळाली असल्याचे पाटील म्हणाले. देशाचं अहित झालं तरी चालेल मात्र भाजप जिंकता कामा नये असे सध्या राजकारण सुरू आहे. जसं काय शरद पवार आणि उद्धव ठाकरे दिल्लीत गेले आणि यांच्यामुळे अरविंद केजरीवाल जिंकले अशा अविर्भावमध्ये बोलत असून दुसऱ्याच्या घरी मुलगा जन्मला म्हणून पेढे वाटण्या सारखं काम हे करत असल्याची टीका असल्याची चंद्रकांत पाटील यांनी केली. Minister Bungalow | मंत्र्यांच्या बंगल्यांवर कोट्यवधींची उधळपट्टी, सर्वाधिक खर्च थोरात आणि भुजबळांच्या बंगल्यावर | ABP Majhaशिवसेनेत हिंमत असेल तर महाराष्ट्र विधानसभा एकटी लढवावी, चंद्रकांत पाटलांचे आव्हान
आफताब शेख, एबीपी माझा | 12 Feb 2020 04:35 PM (IST)