चंद्रकांत पाटील म्हणाले की, कितीही भांडणे असली तरी भाजपला इतर पक्षांना एकत्र येऊन लढावे लागते, यातच भाजपचा विजय आहे. असे बोलून पाटील यांनी भाजप-शिवसेनेच्या युतीचे संकेत दिले आहे.
2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप शिवसेना वेगवेगळे लढले होते. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही वेगवेगळे लढले होते. आगामी निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेची युती होणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युतीदेखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आगामी निवडणुकांमध्ये वेगवेगळे लढून दाखवण्याचे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही पक्षांना दिले आहे.
दरम्यान भाजप-शिवसेना युतीबाबत बोलताना पाटील म्हणाले की, केवळ राज्यात युतीचे सरकार टिकावे यासाठीच मुंबईत भाजपचा महापौर झाला नाही. नाहीतर मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर झाला असता.