= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भिवंडीत धोकादायक यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळली; तीन मजुरांचा मृत्यू तर तीन जण जखमी भिवंडीत धोकादायक यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे . या दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू तर तीन मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत . राजू उर्फ रणछोड प्रजापती ( वय ५० वर्ष ), भगवान मामा ( वय ५५ वर्ष ), मनसुख भाई ( वय ४५ वर्ष ) अशी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मजुरांची नवे आहेत . भिवंडी तालुक्यात काटई ग्राम पंचायत हद्दीत देवानंद कंपाउंड येथे हा धोकादायक यंत्रमाग कारखाना होता . कारखान्याच्या भिंती जीर्ण झाल्याने हा यंत्रमाग कारखाना मागील चार दिवसांपासून बंद होता व कारखान्याच्या जीर्ण झालेल्या भिंतींच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. गवंडी कामगार व मजुरांच्यामार्फत हे काम सुरु होते . यावेळी भिंतीचे काम करण्यासाठी मजुरांनी परांची देखील बांधली होती. त्यावर काम सुरु होते . मात्र हे काम सुरु असतांनाच लोखंडी अँगल व पत्राचा भार जीर्ण भिंतींवर पडल्याने भिंत कोसळली व त्यासोबतच छताचे लोखंडी अँगल व पत्रा देखील खाली कोसळला . या दुर्घटनेत तीन बांधकाम मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर तीन जण या दुर्घटनेत जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत . या घटनेची नोंद निजामपूरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या 6 जणांचा धरणात बुडून मृत्यू - वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या 6 जणांचा धरणात बुडून मृत्यू,
मृतांमध्ये तरुण तरुणीचा समावेश,
वालदेवी धरणावर 9 जण गेले होते वाढदिवस साजरा करायला,
5 मुली आणि 1 मुलगा बुडाल्याची प्राथमिक माहिती,
धरणाजवळ सेल्फी काढण्याच्या नादात तोल गेल्याची चर्चा ,
वाडीवरहे पोलीस घटनास्थळी दाखल,
ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने शोधकार्य सुरू,
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
दिल्लीत कोरोनाचा कहर सुरुच, दिल्लीत कोरोनाचा कहर सुरुच, एका दिवसात सर्वाधिक 19486 कोरोना रुग्णांचे निदान, तर 141 जणांचा मृत्यू
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पोहण्यासाठी गेलेल्या खदाणीत बुडून तिघांचा मृत्यू बीड शहरपासून जवळच असलेल्या पांगरबावडी शिवारात सायंकाळच्या सुमारास खदाणीत बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. सदरील तरुण हे बीड शहरातील गांधी नगर येथील आहेत. पोहण्यासाठी खदाणीत गेले असल्याची प्राथमिक माहिती आहे. दोघांचे मृतदेह सापडले असून एकाचा मृतदेहाचा शोध सुरु आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार, आज जिल्ह्यात तब्बल दीड हजार लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह
एका दिवसात तब्बल 1500 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 24 जणांचा मृत्यू,
शहरातील 371 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 7 जणांचा मृत्यू,
ग्रामीण भागात 1129 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आणि 17 जणांचा मृत्यू
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सोलापूर शहरात आता अत्यावश्यक सेवेतील दुकाने केवळ 1 वाजेपर्यंतच राहणार सुरू सोलापूर शहरात आता अत्यावश्यक सेवेतील दुकाने केवळ 1 वाजेपर्यंतच राहणार सुरू,
अत्यावश्यक कारणे सांगून रस्त्यावर नागरिकांची होणारी गर्दी पाहता पालिका प्रशासनाचा निर्णय,
शहरातील सर्व किराणा दुकान, भाजी मंडई, डेअरी, बेकरी, मटण, चिकन, अंडी दुकाने तसेच सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थ दुकाने सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत सुरू ठेवता येणार,
केवळ दूध संकलनसाठी डेअरी चालकांना सायंकाळी 6 ते 7 पर्यंत परवानगी ,
या शिवाय कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र दुकानात लावणे बंधनकारक,
पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांचे आदेश,
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भाजपचे प्रदेश सचिव प्रा नागनाथअण्णा निडवदे यांचे करोनामुळे निधन लातूर जिल्ह्यातील उदगीरचे रहिवासी असलेले प्रा नागनाथअण्णा निडवदे यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर प्रथम लातूर मग औरंगाबाद येथे उपचार करण्यात आले. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. विद्यार्थी दशेपासूनच ते भाजपचे सक्रिय काम करत होते. भाजपचे प्रदेश सचिव होते.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
उस्मानाबाद जिल्ह्यात संचारबंदी काळातील निर्बंध आणखी कडक उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा आणि संसर्ग कमी होत नसल्याने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी संचारबंदी काळातील निर्बंध आणखी कडक केले आहेत . अत्यावश्यक सेवा वगळता संचार बंदीत सूट दिलेली इतर दुकाने आणि आस्थापना आता सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खुली राहणार असून त्यानंतर ही दुकाने बंद होणार आहेत.
हॉस्पिटल , सार्वजनिक वाहतूक , मालवाहतूक , पेट्रोल पपं, विद्युत व गॅस पुरवठा , एटीएम , अत्यावश्यक सेवासाठी खासगी वाहतूक व बसेस या 24 तास सुरू राहतील तर संचारबंदीत सूट मिळालेली दुकाने आस्थापना या सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत खुली राहतील
विनाकारण रस्त्यावर बाहेर फिरणाऱ्या नागिरकानावर कारवाई होणार आहे. अत्यावश्यक सेवात समाविष्ठ सेवा , मेडिकल हॉस्पिटल हे मात्र 24 तास सुरू राहणार आहेत तर कडक संचारबंदी लागू करण्यासाठी प्रशासन आता आणखी कडक पाऊल उचलत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पुण्यात कौन्सिल हॉलला कोरोना आढावा बैठक पुण्यातील कौन्सिल हॉलला आयोजित कोरोना आढावा बैठकीला उपस्थित राहण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले. प्रमुख प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चार वाजता या बैठकीला सुरुवात होईल.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
यवतमाळ जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून रोजगार हमी आणि फलसंवर्धन मंत्री संदीपान भुमरे यांची नेमणूक यवतमाळ जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून रोजगार हमी आणि फलसंवर्धन मंत्री संदीपान भुमरे यांची नेमणूक. वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे बरेच दिवस रिक्त होते. आता संदीपान भुमरे यांची पालकमंत्री म्हणून राज्य सरकारने नियुक्ती केली आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्याचे आमदार आहेत संदीपान भुमरे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
संदिपान भुमरे यवतमाळ जिल्ह्याचे नवे पालकमंत्री यवतमाळ जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून रोजगार हमी आणि फलसंवर्धन मंत्री संदिपान भुमरे यांची नियुक्ती, वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे बरेच दिवस रिक्त होते.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
यंदा देशभरात सरासरीच्या 98 टक्के पावसाची शक्यता, आयएमडीचा पहिला मान्सून अंदाज जाहीर यंदा देशभरात सरासरीच्या 98 टक्के पावसाची शक्यता, आयएमडीचा पहिला मान्सून अंदाज जाहीर
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होत नसल्याने पिंपरी चिंचवड शहरातील खाजगी डॉक्टरांची अध्यादेश मागे घेण्याची मागणी पुणे : रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होत नसल्याने पिंपरी चिंचवड शहरातील खाजगी डॉक्टरांनी अध्यादेश मागे घेण्याची मागणी केली आहे. कारण थेट रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन मिळेल असा आदेश काढल्यानंतर नातेवाईक त्यांच्याशी हुज्जत घालू लागले आहेत. वादाचे प्रसंग मिटविण्यासाठी वेळेवर रेमडेसिवीरचा पुरवठा करा अथवा खाजगी कोविड रुग्णालय बंद करण्याची परवानगी द्या, अशी मागणी ते करत आहेत. तसं निवेदन देण्यासाठी खाजगी डॉक्टरांची संघटना महापालिकेत दाखल झाली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोल्हापूर शहरात बँकांसमोर गर्दी होत असल्याने पालिका आयुक्त उतरल्या थेट रस्त्यावर कोल्हापूर शहरात बँकांसमोर गर्दी होत असल्याने पालिका आयुक्त उतरल्या थेट रस्त्यावर. बँकेच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर, नागरिक गर्दी करता कामा नये- आयुक्तांचं आवाहन. कोल्हापुरातील कॅनरा बँकेच्या शाखेसमोर नागरिकांनी केली होती गर्दी. ज्येष्ठ नागरिकांना आधी प्रवेश देऊन गर्दी कमी करण्याचा सुचवला पर्याय
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
लोकल ट्रेनमधील गर्दी दुसऱ्या दिवशीही कायम, नालासोपारा स्थानकावर नेहमीच्या संख्येने प्रवासी संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशीही लोकल ट्रेनमधली गर्दी कायम आहे. विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल नेहमीप्रमाणे तुडुंब भरुन जात आहेत. रेल्वे स्थानकावर अद्यापही कोणाचीही तपासणी केल्या जात नाही. त्यामुळे प्रत्येक प्रवासी हा लोकल पकडून मुंबईच्या दिशेने जात आहेत. लोकलची रोजची गर्दी ही नेहमीचीच आहे. गर्दी कमी करा अन्यथा कडक संचारबंदी सुरु होईल, असा इशारा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. पण आज दुसऱ्या दिवशी ही लोकलमध्ये तिच परिस्थिती आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सरकारने बीडला केवळ 20 डोस दिले, पालकमंत्र्यांचं लक्ष कुठे आहे? पंकजा मुंडेंचा पत्रातून सवाल बीड जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर बनली असताना रेमडेसिवीर इंजेक्शन आणि कोरोना लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. अशातच राज्य सरकारने बीडला केवळ 20 डोस दिले आहेत. यासंदर्भात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठवून खेद व्यक्त केला आहे. सरकारने बीडला केवळ 20 डोस दिले असताना पालकमंत्र्यांचं लक्ष कुठे आहे, असा सवालही पंकजा मुंडे यांनी पत्रातून विचारला आहे. दरम्यान, बीडमध्ये सत्ताधाऱ्यांना फक्त माफियांचं हित माहित आहे, जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूटला कोवॅक्सिन लसीची निर्मिती करण्यास परवानगी दिल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. आपल्या ट्वीटमध्ये राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, लसीची संख्या वाढवण्यासाठी हाफकिन इन्स्टिट्यूमध्ये निर्मितीची परवानगी द्यावी अशी मागणी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. पंतप्रधानांनी त्याला परवानगी दिली आहे. याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार मानतो. या महामारीत केंद्राकडून असाच पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूटला कोवॅक्सिन लसीची निर्मिती करण्यास परवानगी दिल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. आपल्या ट्वीटमध्ये राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, लसीची संख्या वाढवण्यासाठी हाफकिन इन्स्टिट्यूमध्ये निर्मितीची परवानगी द्यावी अशी मागणी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. पंतप्रधानांनी त्याला परवानगी दिली आहे. याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार मानतो. या महामारीत केंद्राकडून असाच पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भारताला स्पुतनिक लस याच महिन्यात मिळणार स्पुतनिक लस याच महिन्यात मिळणार. रशियामधील भारतीय राजदूत बाला वेंकटेश वर्मा यांनी म्हटले आहे की रशियाच्या सीओव्हीआयडी -१९ लस स्पुतनिक व्हीची पहिली बॅच एप्रिलमध्ये भारतात दिली जाईल. व्यंकटेश म्हणाले की, भारतात लस उत्पादनाचे प्रमाण हळूहळू वाढत जाईल आणि दरमहा 50 दशलक्ष डोस ओलांडू शकेल.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अहमदनगरमध्ये सहाय्यक निबंधक 50 हजार रुपयांची लाच घेताना एसबीच्या ताब्यात एक प्रकरण मिटवण्यासाठी अहमदनगरमध्ये सहाय्यक निबंधक सुदाम लक्ष्मण रोकडे यांने तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. या लाचेसह त्याला एसबीने कायनेटिक चौकात एका हाॅटेलमध्ये रंगेहाथ पकडलं आहे. तक्रारदार यांनी एका पतसंस्थेकडुन 2014 मध्ये सोने तारण ठेऊन 30 लाख कर्ज घेतले होते. संबधित प्रकरणात पतसंस्थेने तक्रारदार यांचे विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण मिटवण्यासाठी सहायक निबंधकाने एक लाखाची मागितली होती. तडजोड अंती 50 हजार रुपये लाच स्वीकारताना त्याला अटक करण्यात आली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
250 बेड ताब्यात घेण्याविषयी फेरविचार करा, जसलोक हॉस्पिटलची बीएमसीला विनंती जसलोक हॉस्पिटलने मुंबई महापालिकेकडे 250 बेड ताब्यात घेण्याविषयी फेरविचार करण्याची विनंती केली आहे. जसलोक हॉस्पिटलमध्ये 30 कॅन्सर रुग्ण आहेत तर काही रुग्ण अनेक वर्षांपासून अॅडमिट आहेत. रुग्णालयाच्या विनंतीनंतर मुंबई महापालिकेकडून पुन्हा एकदा जसलोक हॉस्पिटलमधील बेड असेसमेंट केले जातील. त्यानंतर नॉन कोविड रुग्णांना इतरत्र हलवणे शक्य आहे का हे तपासले जाईल आणि नंतर बेड ताब्यात घेतले जातील. मात्र, जसलोक हॉस्पिटलमधील बेड ताब्यात घेण्याचा आदेश मागे फिरवलेला नाही असं महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलं आहे. जसलोक हॉस्पिटलमधील बेड असेसमेंटनंतर कोविड रुग्णांसाठी अंदाजे 135 ते 140 पर्यंत बेड ताब्यात घेतले जाऊ शकतात.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
संचारबंदीतचही कुर्ला टर्मिनस परिसरात बेस्ट बसला अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांचीही गर्दी राज्यात 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार नागरिकांना बाहेर पडण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. परंतु तरीही अनेक नागरिक विनाकारण अजूनही बाहेर फिरताना दिसत आहेत. कुर्ला टर्मिनस परिसरातील चित्र पाहिलं तर बेस्टला अत्यावश्यक सेवा वगळता अनेक इतर प्रवासी देखील सर्रास पाहिला मिळत आहेत. त्यामुळे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी दिलेले कडक लॉकडाऊनचे संकेत सरकार राबवणार का हे पाहणं महत्त्वपूर्ण राहिल.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशी ही लोकलची गर्दी कायम नालासोपाराऱ्यात संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशी ही लोकलची गर्दी कायम असल्याचं चित्र आहे. विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल नेहमी प्रमाणे तुडुंब भरून जात आहेत. रेल्वे स्थानकावर अद्यापही कुणाचीही तपासणी केल्या जात नाही. त्यामुळे प्रत्येक प्रवासी हा लोकल पकडून मुंबईच्या दिशेने जात आहे. गर्दी कमी करा अन्यथा कडक संचारबंदी सुरू होईल, असा इशारा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
संचारबंदी च्या दुसऱ्या दिवशी ही लोकल ची गर्दी कायम संचारबंदी च्या दुसऱ्या दिवशी ही लोकल ची गर्दी कायम आहे. विरारहून चर्चगेट च्या दिशेने जाणाऱ्या लोकल नेहमी प्रमाणे तुडुंब भरून जात आहेत. रेल्वे स्थानकावर अद्यापही कुणाचीही तपासणी केल्या जात नाही. त्यामुळे प्रत्येक प्रवासी हा लोकल पकडून मुंबईच्या दिशेने जात आहे. लोकलची रोजची गर्दी ही नेहमीचीच आहे. गर्दी कमी करा अन्यथा कडक संचारबंदी सुरू होईल, असा इशारा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. पण आज दुसऱ्या दिवशी ही लोकलला तीच परिस्थिती आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बोरिवलीत भाजी मार्केटमध्ये प्रचंड गर्दी, अनेक विक्रेते आणि ग्राहक मास्कविना राज्यात संचारबंदीचा दुसरा दिवस आहेत. आज सकाळी बोरिवली पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या भाजी मार्केटमध्ये नागरिकांनी भाजी घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली आहे. खरंतर राज्यात कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होत आहे, त्यामुळे राज्य सरकारने संचारबंदी लागू आहे. मात्र आज बोरिवली भाजी मार्केटमध्ये नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडवल्याचं पाहायला मिळत आहे. विनामास्क मार्केटमध्ये फिरणाऱ्या ग्राहकांची तसंच भाजी विक्रेत्यांची संख्या मोठी आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बीड जिल्ह्यातील वाळू माफियांवर कारवाई करा, पंकजा मुंडे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या गंगा पात्रातून वाळूचा अवैध उपसा सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. हा उपसा तात्काळ थांबवून वाळू माफियांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. जिल्ह्यात आता माफियांची सत्ता असून दहशत जनतेला आणि संरक्षण मात्र चोरांना अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झाल्याची टीका त्यांनी केली आहे. परळी तालुक्यातील मौजे पोहनेर येथील गोदावरी गंगा पात्रातील वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई करुन बुडवलेला महसूल वसूल करावा या मागणीसाठी पोहनेरसह डिग्रस, तेलसमुख, बोरखेड या गावांतील ग्रामस्थ परळी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. ग्रामस्थांनी पोहनेर येथील वाळू उपशाचा प्रकार पंकजा मुंडे यांना सांगताच त्यांनी मुख्यमंत्री, महसूल मंत्री व विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी केली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नाकाबंदी, पोलिसांकडून प्रत्येक वाहनाची तपासणी मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होतं आहे. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या दुसरा दिवस आहे, मात्र मध्यरात्री मुंबईच्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या वतीने नाकाबंदी केली होती. या नाकाबंदीमध्ये मध्यरात्री प्रत्येक गाडीची तपासणी करुन विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर माध्यमातून कारवाई करण्यात आली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आज भारतीय रेल्वेचा वाढदिवस (16.4.1853) 16 एप्रिल 1853 या दिवशी भारतातील पहिली रेल्वे धावली होती. भारताच्या आणि भारतीयांच्या इतिहासातील ही अत्यंत महत्त्वाची घटना ठरली.