सौरभने दोन महिन्यांपूर्वी रस्त्यावर एका चिमुकल्याचा अपघात पाहिला होता. 'तो अपघात वारंवार माझ्या डोळ्यासमोर येतो. अपघातात मृत्युमुखी पडलेला चिमुकला मला बोलावतो, त्याचा आत्मा मला बोलावतो, म्हणून मी आत्महत्या करत आहे' असं कारण सौरभने आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत लिहिलं आहे.
नागपुरातील कसाबपुरा भागातील राहत्या घरी 14 ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास सौरभने गळफास घेतला. सौरभ एका नामांकित कॉलेजमध्ये अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता.