पुण्यातील बैठकीत चर्चा केलेली नावं दिल्लीला पाठवण्यात येतील. दिल्लीकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल.
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाच्या विस्ताराचं घोंगडं भिजत पडलं आहे. कुणा नव्या चेहऱ्याला राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवाय, विभागानुसार मंत्रिपदांचं वाटप होईल का, हेही पाहावं लागणार आहे.