औरंगाबाद, उस्मानाबाद आणि परभणीमध्ये मराठा समाजानं विराट मोर्चा काढून मोठं शक्तीप्रदर्शन केलं. या मोर्च्यांनंतर अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, ही मागणी अयोग्य असल्याचं रामदास आठवलेंनी सांगितलं आहे.
सांगलीत झालेल्या या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते. तर कार्यक्रमाला गैरहजेरी लावणाऱ्या पतंगराव कदम आणि जयंत पाटलांना रामदास आठवलेंनी आपल्या कवितेतून टोला हाणला.