पुणे: संत ज्ञानेश्वर महारांजाच्या पालखीचा प्रवास आज वारीतील सर्वात अवघड भाग असणाऱ्या दिवे घाटातून झाला. तर तुकोबांच्या पालखीने लोणीकाळभोरसाठी प्रस्थान ठेवलं. संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रवास करत आहेत. माऊली महाराजांची पालखी ही सासवड जेजुरी मार्गे पंढरपूरकडे कूच करतेय. तर तुकोबांची पालखी लोणी काळभोर बारामती मार्गे पंढरपूरला पोहचणार आहे.


पुण्यातील दोन दिवसाच्या मुक्कामानंतर माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा असतो. कारण या पालखी मार्गातील एकूण आंतर हे सगळ्यात जास्त चालून जाण्याचा अंतर आहे. पुणे ते सासवड मार्ग दरम्यान दिवे घाटाचा अवघड घाट चालून वारकरी सोपान काकाच्या सासवडमध्ये मुक्कामी थांबतात.


पुण्यातून सकाळी सहा वाजता माऊलींची पालखीने प्रस्थान ठेवले त्यानंतर सकाळी आठ वाजता शिंदे छत्रीला आरती झाली. साधारणतः दहा ते साडे दहाच्या दरम्यान पालखी हडपसरला पोहोचली. हडपसरपर्यंत पुणेकर माऊलींच्या पालखीला निरोप देण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी झाली होती. आजच्या दिवशी तर एकादशी आली आहे त्यामुळे याच हडपसर मार्गावरती ती पुणेकरांनी वारकऱ्यांसाठी फराळाचे वाटप केलं.


तुकोबांच्या पालखीने लोणीकाळभोरसाठी प्रस्थान ठेवलं. आता पुण्यातून बाहेर पडलेल्या माऊली आणि तुकोबांच्या पालख्या शेवटी वाखरीमध्ये एकत्र भेटतात. त्यामुळे विठ्ठल भेटीसाठी आसुसलेले हे वारकरी पुण्यातून वेगळे होतात. माऊली महाराजांची पालखी ही सासवड जेजुरी मार्गे पंढरपूरकडे कूच करतेय. तर तुकोबांची पालखी लोणी काळभोर बारामती मार्गे पंढरपूरला पोहचणार आहे. पुणे ते सासवड तब्बल 35 किलोमीटरचा अंतर कापून जात असताना याच रस्त्यात लागतो तो हा तब्बल साडेचार किलोमीटरचा वळणदार दिवे घाट.


सुप्रिया सुळेंनी दिवे घाट पायी सर केला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या. दरवर्षी सुप्रिया सुळे पालखी सोहळ्यात चालत असतात. यंदाच्या वर्षी देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी वडकी ते दिवे घाट पायी वारी केली. संपूर्ण दिवे घाट पायी सर केला आहे. 


वारकऱ्यांसोबत ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत पुण्यामधले तरुण-तरुणी अनेक नोकरदार आणि गृहिणी सुद्धा दिवेघाटात साडेचार किलोमीटर अंतर चालत असतात. वारीच्या वाटेवर सेल्फी आणि फोटोच्या क्लिक जेवढ्या दिवे घाटामध्ये मिळत असतील कदाचित तेवढ्या संपूर्ण वारीच्या वाटेवर कधीच पाहायला मिळत नसायच्या.


सध्या पालख्यांचा प्रवास घाटातून होत असताना याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.