मुख्ममंत्री आज रोजगार मेळाव्यासाठी आज अमरावतीला जाणार आहेत. मात्र त्यापूर्वी इर्विन चौक ते पंचवटी चौकपर्यंतचा रस्ता काल हजारो लिटर पाणी टाकून साफ करण्यात आला.
राज्याच्या काही भागात दुष्काळ आहे, गावातील नागरिक पाण्यासाठी वणवण करत आहेत, त्याचवेळी अमरावतीमध्ये मात्र टँकरद्वारे हजारो लिटर पाणी रस्त्यावर टाकलं जात आहे.
याबाबत प्रशासनाकडून कोणीही बोलायला तयार नाही. मात्र हे पाणी रस्त्यावर कोणी टाकलं याचा शोध प्रशासन घेत आहे.