निवडणूक निकाल २०२६
(Source: ECI/ABP News)
वाल्मिकीचा वाल्या होण्याची शंका, उद्धव ठाकरेंचा दानवेंना टोला
एबीपी माझा वेब टीम | 15 May 2017 04:32 PM (IST)

अकोला : जलयुक्त शिवार योजनेमध्ये जर घोटाळे होत असतील, तर या योजनेत आणि सिंचन घोटाळ्यामध्ये फरक काय राहिला? असा प्रश्न उपस्थित करुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच लक्ष्य केलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या शेतकऱ्यांना हिणवणाऱ्या वक्तव्याचाही समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला. 'वाल्याच्या वाल्मिकी करण्याची ताकद भाजपमध्ये आहे, असं भाजप नेते म्हणतात. मात्र ज्या पद्धतीने भाजप नेते वक्तव्य करत आहेत, ते पाहता वाल्मिकीचा वाल्या होत आहे की काय अशी शंका येत आहे' अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.