Agniveer Schemeकोल्हापूरमध्ये 22 नोव्हेंबरपासून होणाऱ्या अग्निवीर भरतीसाठी जय्यत तयारी सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या भरतीसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कर्नाटकातून लाखांवर तरुणांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे उमेदवारांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. भरतीला येणाऱ्या उमेदवारांना राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावर एकत्र करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येकी 200 किंवा सैन्य दलाकडून मागणी होईल त्याप्रमाणे उमेदवारांना शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सोडण्यात येईल. त्याठिकाणी या उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या होतील. 


या पार्श्वभूमीवर 21 नोव्हेंबर ते 12 डिसेंबरदरम्यान कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. भरती प्रक्रिया सुरळीत व सुरक्षित होण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून वाहतूक मार्गात बदल करण्यात येत आहेत. भरतीकरिता येणारे उमेदवार त्यांच्या खासगी वाहनाने, एसटी बस, रेल्वेने येणार असून, वाहनांची व लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.  


वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला मार्ग



  • सायबर चौक, एनसीसी भवन ते एस.एस.सी. बोर्डपर्यंत इंदिरा सागर चौकाकडे जाणारा मार्ग केएमटी बस व ऑटोरिक्षा वाहने वगळून अन्य सर्व वाहनांना प्रवेश बंद.


वळविण्यात आलेले मार्ग 



  • सायबर चौकातून शेंडा पार्क, हॉकी स्टेडियमकडे जाणारी वाहने ही सायबर चौकातून एसएससी बोर्ड चौकापर्यंत, तसेच एसएससी बोर्डकडून सायबर चौकाकडे येणारी जाणारी वाहने ही एकेरी मार्गानेच ये-जा करतील.


वाहतुकीसाठी बंद व सुरू करण्यात येणारे मार्ग 



  • राजाराम रायफल्स ते प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरमार्गे सायबर चौक येणारा मार्ग हा राजाराम रायफल्स चौकात वाहतुकीसाठी सोयीनुसार बंद व सुरू करण्यात येईल (स्कूलबस, विद्यार्थी वाहतूक रिक्षा, भरती प्रक्रियेकरिता येणारी वाहने वगळून)


पार्किंग व्यवस्था व मार्ग


भरती प्रक्रियेसाठी येणाऱ्या उमेदवारांनी त्यांची दुचाकी, चारचाकी वाहने प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरच्या बाजूच्या रस्त्याने, सारथी इमारत येथून राजाराम महाविद्यालयाच्या पटांगणात पार्क करावीत. उमेदवार अवजड वाहनांतून आल्यास त्यांनी वाहनांनी राजाराम महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार येथून प्रवेश करून राजाराम महाविद्यालयाच्या पटांगणात वाहने पार्क करावीत.


इतर महत्वाच्या बातम्या