निवडणुका संपल्या तरी त्यादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये असलेला राग अद्यापही कमी झालेला नाही. औरंगाबादमध्ये शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा पाहायला मिळाला. यावेळी गाडीची काचही फोडण्यात आली. सुरुवातील औरंगाबादमध्ये एका लग्नात दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर गावात परतल्यानंतर पुन्हा दोन्हीकडचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी तुफान हाणामारीही झाली.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच, पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेत 14 जणांना ताब्यात घेतलं. या हाणामारीमुळे गावात बराच वेळ तणावाचं वातावरण होतं.