Aaditya Thackeray Meets Sharad Pawar : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक निवासस्थानी पोहोचले. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असले, तरी थेट घरी जाऊन भेट घेतल्याने राजकीय भूवया उंचावल्या. आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांची जवळपास 25 मिनिटे भेट झाली. आदित्य ठाकरे यांनी सिनेट निवडणुकीवरून शिंदे सरकारला धारेवर धरले होते. न्यायालयाने दणका दिल्यानंतर ही निवडणूक झाली असून उद्या निकाल आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांना सोमय्यांच्या पत्नीवर केलेल्या दाव्यानंतर झालेली 15 दिवसांची शिक्षा तसेच जागा वाटपाच्या वाटपाच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याची शक्यता नाकारता येत नाही. 


मुंबई तुंबली, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल 


दुसरीकडे, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत बुधवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत पावसाने धुमाकूळ घातला. पावसामुळे सखल भाग पाण्याखाली गेला होता. लोकल सुद्धा ठप्प झाल्या होत्या. मुंबईकडे येणारी सुमारे 14 उड्डाणे वळवावी लागली. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना दैनंदिन कामकाजात अडचणींचा सामना करावा लागला. आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारला धारेवर धरले. आदित्य ठाकरे म्हणाले की, "मुंबई, ठाणे आणि पुण्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागले. 2005 नंतर पहिल्यांदाच पश्चिम द्रुतगती मार्ग बुधवारी तुडुंब भरलेला दिसला. नागरिकांना मदत करणारी बीएमसीची टीम कुठेही दिसली नाही. खड्डे. साफसफाई करायला हवी होती, पण अनेक ठिकाणी रस्ते खोदले गेले आहेत.


इतकी वाईट परिस्थिती याआधी पाहिली नव्हती


आदित्य ठाकरे म्हणाले की, "ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना समस्यांना सामोरे जावे लागले. इतकी वाईट परिस्थिती याआधी कुठेही दिसली नव्हती. मुंबई, पुणे, ठाणे याकडे कोणी लक्ष देत नाही. महापालिका प्रशासन रस्त्यावर दिसत होते का? अनेक पंप. पश्चिम कधीही काम न करणारा एक्स्प्रेस वे बुधवारीही पूर्ण भरला होता. मुंबई चालवणारे कुठे होते, असा सवाल माजी मंत्री ठाकरे यांनी केला. आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर निशाणा साधत रेल्वेची स्थिती चांगली नाही, प्रभारी कुठे होते?


मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालये बंद


मुंबईत काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी अजूनही पाणीच पाणी आहे. चेंबूर, घाटकोपर, नवी मुंबई, नेहरूनगर, कुर्ला दहिसर पूर्व, बेलापूर, चुनाभट्टी या भागात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. हवामान खात्याने गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता. ती वाढवून दुपारी 1 वाजेपर्यंत करण्यात आली. त्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या