बेळगाव : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जण मृत्यूमुखी पडले आहेत. दुपारच्या सुमारास घाटातील अमर हॉटेल समोर हा अपघात झाला.


अपघातातील मृत नागरिक मुरगूड येथील असून त्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृत्यूकांमध्ये चार पुरुष, एक महिला आणि बालक असल्याची पोलिसांना प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मृत झालेल्या व्यक्तींमध्ये मुरगुडच्या जमादार कुटुंबियांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.ही धडक इतकी जोरदार होती की ट्रकने या कारला 200 फूट अंतर फरफटत नेलं. यात कारचा चक्काचूर झाला आहे. तर

या अपघाताची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.