हा अपघात एवढा भीषण होता, की पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.
पाचोरा येथील वाणी परिवार धुळ्याला विवाहासाठी गेला होता. विवाह आटोपून परत येत असताना हा अपघात झाला. अपघात सकाळी चार वाजेच्या सुमारास घडला आहे.