नवी दिल्ली: लोकसभेच्या निवडणुका होऊन जवळपास दोन वर्ष लोटली आहेत. यंदा कोरोनाचं संकट, बऱ्याच राजकीय घडामोडीनंतर देशातील राजकीय स्थितीमध्ये बराच बदल झाला आहे. या स्थितीचा अंदाज घेण्यासाठी एबीपी न्यूज आणि सी व्होटरने सर्वे घेऊन देशाचा मूड जाणून घेतला. महाविकास आघाडी सरकारची एका वर्षाची कामगिरी कशी होती? महाविकास आघाडी सरकार कोरोना हाताळण्यात कितपत यशस्वी?  याबाबत या सर्व्हेतून मतं जाणून घेतली गेली.

असा आहे संपूर्ण सर्वे 

महाविकास आघाडी सरकारची एका वर्षाची कामगिरी कशी होती? खूप चांगली - 43 टक्के चांगली - 19 टक्के साधारण - 17 टक्के वाईट - 11 टक्के अत्यंत वाईट - 10 टक्के

महाविकास आघाडी सरकार कोरोना हाताळण्यात कितपत यशस्वी? खूप प्रभावीपणे - 50 टक्के प्रभावीपणे - 23 टक्के साधारण - 12 टक्के वाईट - 15 टक्के

केंद्राच्या कामावर देशातील जनता किती समाधानी? खूप समाधानी - 42  टक्के समाधानी - 25 टक्के असमाधानी - 30 टक्के सरासरी - 37

पंतप्रधानांच्या कामावर देशाची जनता किती समाधानी?

खूप समाधानी - 49 टक्के समाधानी - 22 टक्के असमाधानी - 26 टक्के सरासरी - 45 टक्के

पंतप्रधानांच्या कामावर राज्याची जनता किती समाधानी?

खूप समाधानी - 48 टक्के समाधानी - 25 टक्के असमाधानी - 26 टक्के सरासरी - 47 टक्के

राहुल गांधींच्या कामावर देशाची जनता किती समाधानी? खूप समाधानी - 19 टक्के समाधानी - 20 टक्के असमाधानी - 44 टक्के

राहुल गांधींच्या कामावर राज्याची जनता किती समाधानी? खूप समाधानी - 17 टक्के समाधानी - 21 टक्के असमाधानी - 53 टक्के