sangola accident : कार्तिकी यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी येथून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीत सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे मागून कार घुसल्याने आठ वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 5 महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. दरम्यान, या अपघातात 8 जण जखमी झाले आहेत.  आज सायंकाळी सात वाजता ही दिंडी सांगोला तालुक्यातील जुनोनी येथील बायपास रस्त्याजवळ आली असताना मिरजेकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कार (एमएच-12-DE-8938) दिंडीत घुसली आणि वारकऱ्यांना चिरडत पुढे गेल्याने 8 वारकऱ्यांचा मृत्यू झाला. 


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील विठ्ठल भक्त मंडळाच्या वतीने पायी दिंडीचे आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच जठारवाडी गावावर शोककळा पसरली आहे. अपघातामधील मृतांची नावे समजलेली नाहीत. माहिती मिळताच काही ग्रामस्थांनी अपघाताची माहिती मिळताच सांगोल्याकडे रवाना झाले आहेत.


अपघात झालेली कार सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील असल्याचे समाजत असून यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातात जखमी झालेल्या सहा वारकऱ्यांवर सांगोला येथे उपचार सुरु असून आहेत.  सांगोला पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी येऊन जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. मृत आणि जखमींची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. 


मृत वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा


कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे.


मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या