मुंबई : राज्यातील 31 जिल्ह्यांमधील 561 ग्रामपंचायती आणि 237 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीत प्राथमिक अंदाजानुसार 82 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी याबाबत माहिती दिली.


या निवडणुकांसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान पार पडलं. गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत मात्र केवळ दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचंही निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं.

पालघर, भंडारा आणि गोंदिया हे तीन जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यांतील मतमोजणी उद्या (सोमवार) होईल. पालघर, भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांत लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्याच मतदान होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत आज झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी 4 जून 2018 रोजी होईल.

मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या : (कंसात पोटनिवडणुकांसाठी मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या)

ठाणे- 4(8), पालघर- 2(9), रायगड- 159(5), रत्नागिरी- (1), सिंधुदूर्ग- 2, नाशिक- 20(7), धुळे- 7, जळगाव- 7(5), अहमदनगर- 70(12), नंदुरबार- (2), पुणे- 80(15), सोलापूर- 3(22), सातारा- 15(4), सांगली- 71(5), कोल्हापूर- 62(11), औरंगाबाद- 4(6), बीड- 2(1), नांदेड- 3(6), उस्मानाबाद- 1(7), परभणी- 1(1), जालना- (3), लातूर- 4(3), हिंगोली- (1), अमरावती- (6), अकोला- 1(4), यवतमाळ- 25(6), वाशीम- (2), बुलडाणा- (3), वर्धा- 14(5), चंद्रपूर- (2), भंडारा- 4(1), गोंदिया- (5) आणि गडचिरोली- (6)  एकूण 561(174)