पूलगावच्या नगराध्यक्षांसह चार नगरसेवकांचं पद रद्द
एबीपी माझा वेब टीम | 23 Jun 2016 11:55 AM (IST)
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील पूलगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष मनिष साहू यांच्यासह पाच नगरसेवकांचं पद रद्द करण्यात आलं आहे. वर्ध्याच्या जिल्हाधिकारी शैलश नवाल यांनी ही कारवाई केली आहे. नगराध्यक्ष साहू यांच्यासह पाच नगरसेवक काँग्रेस सोडून भाजपाच्या गटात सहभागी झाले होते. याविरोधात काँग्रसेच गटनेते राजन चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. राजन चौधरींच्या तक्रारीवर कारवाई करत जिल्हाधिकाऱ्यांनी मनिष साहूंसह पाचही नगरसेवकांचं सदसत्त्व रद्द केलं आहे.