जालना : जालना जिल्ह्यात आज एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.


अंबड तालुक्यातील बेलगाव येथील शेतकरी कैलास मोताळे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळल्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. मोताळे यांच्याकडे साडेचार एकर जमीन आहे, मात्र त्यांच्यावर दोन लाखांचं कर्ज होतं. तर घनसावंगी तालुक्यातील मांदळा गावातील शेतकरी गोविंदराव धबडकर यांनी विष प्राशन करुन आयुष्य संपवलं आहे. धबडकर यांच्यावरही बँक ऑफ महाराष्ट्रचं 2 लाख 15 हजारांच कर्ज होतं.

दोनही शेतकऱ्यांनी कर्ज फेडण्याच्या विवंचनेतूनच आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. या आत्महत्येच्या दोन्ही घटनांमुळे जालना जिल्हा पुन्हा चर्चेत आला आहे.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रात 2016 मध्ये 3 हजार 52 शेतकऱ्यांच्या आत्महत्या


मुलीच्या लग्नासाठी हुंडा नाही, लातूरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या


कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या