बोगस परीक्षार्थी बसवून सरकारी नोकऱ्या लाटणारे 15 अधिकारी अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 07 Mar 2018 11:23 AM (IST)
विशेष तपास पथक अर्थात एसआयटीने कारवाई करुन सरकारी नोकऱ्या लाटणाऱ्या 15 जणांना अटक केली
उस्मानाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या परीक्षेमध्ये बोगस परीक्षार्थी बसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बोगस परीक्षार्थींच्या माध्यमातून सरकारी सेवा मिळवणाऱ्या 15 सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष तपास पथक अर्थात एसआयटीने ही कारवाई केली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये 400 जणांनी बोगस परीक्षार्थी म्हणून परीक्षा दिल्याचा संशय आहे. त्यापैकी 40 जणांना सरकारी सेवेचा लाभ झाला आहे. 40 जणांपैकी 15 जणांना काल राज्याच्या विविध भागातून अटक करण्यात आली. हे सर्व सरकारी सेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत.