Nagpur-Ratnagiri National Highway : रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी (Nagpur-Ratnagiri National Highway) भूसंपादन करण्यात आले आहे. हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, करवीर आणि हातकणंगले अशा चार तालुक्यातील गावांमधून जाणार आहे. त्यामुळे महामार्गासाठी आंबा ते चोकाकपर्यंत जमीन संपादनाचे कामकाज सुरु आहे. त्याबाबतचे निवाडे पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी गावनिहाय उद्यापासून (19 जानेवारी) शिबिर घेतले जाणार असल्याची माहिती प्राधिकारी तथा भूसंपादनच्या उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांनी दिली आहे. 

Continues below advertisement

नुकसानभरपाईच्या रकमेचे वाटप करताना आवश्यक कागदपत्रांसह संबंधित गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन कदम यांनी केले आहे.

नुकसानभरपाई रक्कम वाटपाकरिता गावनिहाय शिबिर पुढीलप्रमाणे 

  • 19 जानेवारी : टोप (हातकणंगले), माले (हातकणंगले), चोकाक (हातकणंगले), नागांव (हातकणंगले)
  • 20 जानेवारी : वडगांव (हातकणंगले), हेर्ले (हातकणंगले), केर्ले (करवीर), पडवळवाडी (करवीर)
  • 21 जानेवारी :  केर्ली (करवीर), निगवे दुमाला (करवीर), जठारवाडी (करवीर), कुशिरे तर्फ ठाणे (पन्हाळा)
  • 22 जानेवारी : दाणेवाडी (पन्हाळा), पिंपळे तर्फ सातवे (पन्हाळा), बोरपाडळे (पन्हाळा), नावली (पन्हाळा)
  • 23 जानेवारी : देवाळे (पन्हाळा), पैजारवाडी (पन्हाळा), आवळी (पन्हाळा), नेबापूर (पन्हाळा), आंबवडे (पन्हाळा). 
  • 24 जानेवारी : खुटाळवाडी (शाहूवाडी), डोणोली (शाहूवाडी), वाडीचरण (शाहूवाडी), चरण (शाहूवाडी)
  • 25 जानेवारी : ठमकेवाडी (शाहूवाडी), बांबवडे (शाहूवाडी), गोगवे (शाहूवाडी), सावे (शाहूवाडी)
  • 26 जानेवारी : भैरेवाडी (शाहूवाडी), करंजोशी (शाहूवाडी), ससेगांव (शाहूवाडी), कोपार्डे (शाहूवाडी)
  • 27 जानेवारी : पेरीड (शाहूवाडी), कडवे (शाहूवाडी), जाधववाडी (शाहूवाडी), येलूर (शाहूवाडी)
  • 28 जानेवारी : करुंगळे (शाहूवाडी), निळे (शाहूवाडी), वालूर (शाहूवाडी), वारुळ (शाहूवाडी)
  • 29 जानेवारी : चांदोली (शाहूवाडी), केर्ले (शाहूवाडी), चनवाड (शाहूवाडी)
  • 30 जानेवारी : आंबा (शाहूवाडी) व तळवडे (शाहूवाडी) 

एजंटकडून लूट होत असल्याचा आरोप

दरम्यान, 15 दिवसांपूर्वी, कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांची एजंटकडून लूट होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. त्यामुळे तक्रार निवारण शिबिरासाठी आलेल्या दुय्यम कनिष्ठ अधिकाऱ्यांना रोषाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे संपादित जमिनीचा मोबदला मिळाला नसताना महामार्गाच्या कामात सुरुवात झाल्याने बोरपाडळे (ता. पन्हाळा) येथील शेतकऱ्यांनी काम बंद पाडले होते. विशेष भूसंपादन कार्यालयाकडे कागदपत्रांची पूर्तता करुनही शेतकऱ्यांना अनेक फेऱ्या माराव्या लागत आहेत. याचा गैरफायदा घेणाऱ्या कमिशन एजंटांनी भूसंपादन कार्यालयाचा ताबा घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या