Kumbhi Kasari Sakhar Karkhana Election : करवीर तालुक्यातील कुडित्रेतील कुंभी-कासारी साखर कारखाना निवडणुकीसाठी चुरशीने 82.45 टक्के मतदान झाले. कारखान्याच्या 23 जागांसाठी माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वात सत्ताधारी नरके पॅनेलमधून 23 उमेदवार, तर विरोधी राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलमधून गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली 23 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. कारखान्यावर (Kumbhi Sakhar Karkhana Election) चंद्रदीप नरके यांची एकहाती सत्ता आहे. उद्या मंगळवारी (14 फेब्रुवारी) कसबा बावड्यातील रमणमळात 3 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.


आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी रविवारी (12 फेब्रुवारी)संस्था गटातील मतदान एकाच वेळी कोपार्डेत केले. दोघांनी विजयी खूण दाखविल्यानंतर त्या फोटोसह ‘जसं ठरलंय, तसंच करतोय’ वाक्य चांगलेच व्हायरल झाले. कारखान्याच्या निवडणुकीत (Kumbhi Sakhar Karkhana Election) सतेज पाटील गटाकडून नरकेंच्या पाठिशी ताकद लावण्यात आली आहे. मांडुकलीत झालेल्या सभेत डी. वाय. पाटील साखर कारखाना, गोकुळ संचालक, माजी सभापती तसेच गगनबावडा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती. गोकुळचे संचालक बयाजी शेळके यांनी नरके पॅनेलच्या मागे उभे राहण्याचे आवाहन याच सभेतून केले होते.  


गोकुळमध्ये चंद्रदीप नरकेंची साथ


गोकुळमध्ये सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या आघाडीने महाडिक गटाचा पाडाव केला होता. यावेळी चंद्रदीप नरके यांनी सतेज पाटील यांना साथ दिली होती. ‘गोकुळ’ विरोधातील मोर्चातही होते. त्यामुळे पाटील गट कुंभीच्या निवडणुकीत नरकेंच्या पाठिशी राहिला. दुसरीकडे, संपूर्ण 23 उमेदवार विजयी होतील, असा दावा नरके पॅनेलच्या वतीने केला आहे. विरोधी आघाडीकडून कारखाना (Kumbhi Sakhar Karkhana Election) आर्थिक अडचणीत आहे, कारखान्याचे खासगीकरण होईल, ते होऊ देणार नाही, यासाठी सभासद आमच्याबरोबर आहेत, असे म्हणत आमचे 23 उमेदवार विजयी होतील, असा दावा विरोधी शाहू आघाडीने केला आहे. 


दरम्यान, वाकरेत मतदानानंतर एका एसटीमधून एकच मतपेटी कर्मचारी घेऊन जात असताना शाहू आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे गाड्या पाठवून रमणमळा इथेपर्यंत कार्यकर्ते एसटीबरोबर गेले. दुसरीकडे, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चेतन नरके इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवरुन चर्चा रंगली आहे. अरुण नरकेंची भूमिका विरोधी आघाडीला विजयी बळ देणार का? अशीही चर्चा रंगली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या