Kolhapur News: आईच्या आकस्मिक निधनानंतर रक्षाविसर्जन करून घरी परतल्यानंतर वडिलांचेही निधन झाल्याने त्यांनाही त्याच दिवशी निरोप देण्याची वेळ दुर्दैवी मुलांवर आली. ही हृदयद्रावक घटना कोल्हापूर शहरात (Kolhapur News) घडली. या घटनेनंतर काशिद कॉलनी, सानेगुरुजी वसाहतीमधील देशपांडे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. एका कंपनीतून अधिकारी पदावरून निवृत्त झालेल्या सदानंद देशपांडे यांच्या पत्नी सुरेखा (वय 77) यांचे रविवारी 2 जुलै रोजी निधन झाले. त्यांचे रक्षाविसर्जन मंगळवारी 4 जुलै रोजी सकाळी करण्यात आले. रक्षाविसर्जनासाठी घरी मित्रमंडळींसह नातेवाईकसुद्धा आले होते. सुरेखा देशपांडे यां दु:खाचा डोंगर असतानाच त्याच दिवशी दुपारी साडेतीन वाजता सदानंद देशपांडे (वय 84) यांचेही आकस्मिक निधन झाले.


त्यामुळे आईचे रक्षाविसर्जन करून नदीवरून परतलेल्या त्यांच्या मुलांना त्याच दिवशी वडिलांनासुद्धा अखेरचा निरोप देण्याची वेळ आली. देशपांडे हे मुळचे आजरा तालुक्यातील आहेत. समीर देशपांडे आणि सारस्वत बँकेतील राजारामपुरी शाखेतील वरिष्ठ शाखाधिकारी शिशिर देशपांडे यांचे ते आईवडील होत.


विजेच्या तारेच्या धक्क्याने मायलेकराचा जागीच मृत्यू


दरम्यान, जिल्ह्यातील (Kolhapur News) पन्हाळा तालुक्यातील (Panhala) नेबापूरमध्ये शेतामधील तुटलेल्या वीजेच्या तारेचा स्पर्श होऊन माय लेकरांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना 29 जून रोजी घडली होती. शेतात मुलगा नेहमीप्रमाणे काम करण्यासाठी गेल्यानंतर परत न आल्याने आई पाहण्यासाठी गेल्यानंतर त्यांनीही स्पर्श केल्याने मृत्यू झाला. नंदा गुंगा मगदूम आणि आणि त्यांचा मुलगा अजिंक्य गुंगा मगदूम अशी जागीच मृत्यूमुखी पडलेल्या मायलेकरांची नावे आहेत.


अजय नेहमी सकाळच्या सुमारास शेतात जातो. नेहमीच्या सवयीने तो आजही शेतात कामासाठी सकाळी सातच्या सुमारास गेला होता. तासभर काम करून घरी परतणारा मुलगा अजय अजून कसा घरी परतला नाही? या चिंतेत असलेल्या आईने मुलगा फोन केला. मात्र, फोन न उचलल्याने त्या पाहण्यासाठी शेतात गेल्या. शेतात अजय पडल्याचे दिसून आल्यानंतर आई नंदा यांनी अजयला उचलण्याच्या नादात स्पर्श केला असावा आणि त्यांनाही वीजेचा धक्का बसला. 


इतर महत्वाच्या बातम्या :