कोल्हापूर : अनैतिक संबंधाच्या संशयातून वाद झाल्याने मिटवामिटवी करून घरी जात असताना पुन्हा वाद झाल्याने वन कर्मचाऱ्याचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात वारे वसाहतमध्ये महादेव मंदिरानजीक घडली. वन कर्मचारी भास्कर शंकर कांबळे (वय 50, रा. आणाजे, ता. राधानगरी) याचा डोक्यात दगड घालून निघृर्ण खून केला. संशयित आरोपी भाजीपाला विक्रेता असलेला युवराज बळवंत कांबळे (वय 27 रा. कुडूत्री, ता. राधानगरी) याने निर्घृण खून केल्यानंतर पोलिसांत हजर झाला. दोघेही राधानगरी तालुक्यात असून सध्या ते भाड्याने वारे वसाहतमध्ये राहत होते. याठिकाणीच  बुधवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.  


अनैतिक संबंध असल्याचा संशय  


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मयत भास्कर कांबळे व संशयित आरोपी युवराज कांबळे मित्र होते. त्यामुळे दोघेही वारे वसाहतमध्ये राहत असल्याने त्यांची ये-जा सुरु होती. भास्करला युवराजचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने त्यांच्यात वाद झाला झाला होता. गेल्या काही दिवसांपासून हा वाद होता. 


जीवे मारण्याची धमकी दिल्याने केला खून


दरम्यान, पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने युवराजशी वाद झाल्यानंतर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. त्यामुळे दोघांमध्ये झालेल्या वादामुळे तो मिटवण्यासाठी बुधवारी सायंकाळी दोघेही संभाजीनगरमधील मित्राच्या घरात एकत्र आले होते. वाद मिटवून परतून जाताना वारे वसाहत येथील महादेव मंदिराजवळ त्यांच्यात पुन्हा वाद झाला. यावेळी झालेल्या झटापटीत गाडी सोडून भास्करने बाजूला असलेल्या शेताकडे पळत गेला. मात्र, त्याठिकाणी सुद्धा युवराजने त्याला गाठून भास्करच्या डोक्यात दगड घालून युवराजने ठार मारले.  त्यानंतर तो स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. भास्करला मी मारलं नसतं तर त्याने मला मारले असते. गेल्या काही दिवसांत तो माझ्या घरी येऊन कुटुंबीयांना त्रास देत होता, असे त्याने पोलिसांना सांगितले. भास्करची पत्नी आणि युवराजची ओळख फेसबुकवरून झाली होती. दोघेही जवळच्या गावात राहत असल्याने मैत्री वाढली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या