कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यातील वेदगंगा नदीवर असणाऱ्या बस्तवडे बंधाऱ्यात बुडून चौघांचा दुर्दैवी अंत झाला. बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी दोन महिलांसह तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले. अन्य एकाचा शोध सुरु आहे. जितेंद्र विलास लोकरे (वय 36, मुरगुड), रेश्मा दिलीप येळमल्ले (वय 34, अथणी, कर्नाटक), सविता अमर कांबळे (वय 27 रुकडी), यश दिलीप येळमल्ले (वाय 17, अथणी, कर्नाटक) अशी त्यांची नाव आहेत. हे सर्व जण आणूरमध्ये यात्रेसाठी पाहुण्यांच्या घरी आले होते. नदीवर धुणे धुण्यासाठी गेल्यानंतर चौघांचा बुडून मृत्यू झाला. 


इतर महत्वाच्या बातम्या