जळगाव :  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांनी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या विरोधात पाच कोटींचा अब्रू नुकसानीचा दाखल केलेला दावा मागे घेतला आहे. दोघांकडून गैरसमजतीतून हा प्रकार झाला होता त्यानंतर दोघांमध्ये आपसात तडजोड तसेच समझोता झाल्यानंतर  दोघांकडून लेखी घेण्यात येऊन हा खटला मागे घेण्यात आला. पाच कोटींच्या अब्रू  नुकसानीचा हा दावा मागे घेण्यात आल्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे


2016 मध्ये एकनाथ खडसे हे मंत्री असताना त्यांच्या विरोधात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका भाषणात घोटाळा केल्याचा आरोप केला होता. याबाबत एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्हा न्यायालयात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरुद्ध पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. या दाव्यात तारखेवर एकदा मंत्री गुलाबराव पाटील हे गैरहजर राहिले तर दुसऱ्या तारखेवर एकनाथ खडसे व गुलाबराव पाटील हे दोघेही गैरहजर झाले होते. न्यायालयाने दोघांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड सुद्धा केला होता.


अब्रू नुकसानीच्या दाव्यासंदर्भात आज सुनावणी पार पडली 


या प्रमुख नुकसानीच्या खटल्यात आज जळगाव जिल्हा न्यायालयात तारीख होती या तारखेवर मंत्री गुलाबराव पाटील तसेच ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे दोन्हीही नेते हजर असल्याचे पाहायला मिळालं. न्यायालयात अब्रू नुकसानीच्या दाव्यासंदर्भात आज सुनावणी पार पडली. यात एकनाथ खडसे व मंत्री गुलाबराव पाटील या दोघांचे लेखी नोंदवून घेण्यात येऊन दोघांमध्ये तडजोड झाल्याने हा खटला मागे घेण्यात आला आहे. या खटल्यासंदर्भात दोघांमध्ये समजूत झाली असून दोघांच्या गैरसमजतेतून हा दावा दाखल झाला होता. याबाबत दोघांनी न्यायालयात लेखी दिले आहे. त्यानुसार आता हा दावा मागे घेण्यात आला असल्याची पहिली प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.


आरोप करताना पुराव्यानिशी करावेत


मंत्री गुलाबराव पाटील यांनी न्यायालयासमोर त्यांच्या विरोधात दाखल केलेला आपलं नुकसानीचा दावा हा मागे घेण्याची विनंती केली ती मान्य केली. आपसात बसून हा दावा निकाली काढण्यात आला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी घ्यायला येण्याचे आवाहनावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, त्यांच्यासोबत चहा घ्यायला हरकत नाही आमची काही दुश्मनी नाही अस खडसे म्हणाले. यानंतर अशा प्रकारचे आरोप करताना त्यांनी पुराव्यानिशी करावेत,  असे खडसे म्हणाले.


न्यायालयातील या दाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांचे वकील यांनी बोलताना म्हटले आहे की, दोघांमध्ये गैरसमजूत झाली होती त्यानुसार तडजोड  झाल्यानंतर न्यायालया समोर दोघांची लेखी घेण्यात येऊन हा दावा मागे घेण्यात आला आहे.