क्वार्सीच्या जमालपूर कॉलनी परिसरात ही घटना घडली. पीडित सलमानने सहा महिन्यांपूर्वी खाईडोरीमध्ये राहणाऱ्या नगमासोबत लग्न केलं होतं. नगमाने अत्यंत क्षुल्लक कारणावरुन पती सलमानवर उकळतं पाणी ओतलं.
दाढी केली नाही म्हणून अनेकदा पत्नी चिडत असे, असे पीडित सलमान सांगतात. धक्कादायक म्हणजे, अनेकदा पत्नी मारण्याची धमकीही देत असे.
पीडित सलमानने क्वार्सी पोलिस ठाण्यात पत्नी नगमाविरोधात तक्रार दाखल केली असून, या प्रकरणात न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.