या कार्यक्रमात बोलताना उत्तर प्रदेशच्या 22 कोटी जनतेला सुरक्षा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं आदित्यनाथ यांनी सांगितलं. व्यापारी, सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी, माता-भगिनींवर वाईट नजर टाकली किंवा दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला, तर आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवला जाईल, असंही ते म्हणाले.
"राज्यातील बिघडलेली कायदा-सुवस्था सुधारण्यासाठी काम सुरु आहे. वारसाहक्कात 15 वर्षांपासून बिघडलेली कायदा-सुव्यवस्था मिळाली आहे, ती सुधारण्यासाठी काही काळ लागेल," असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.