मुंबई: राजस्थानमधील नाथद्वारा (Nathdwara Rajasthan) येथे स्थित 'विश्वास स्वरूपम'ने (Vishwas Swaroopam Statue of Belief) नोव्हेंबर 2022 मध्ये उद्घाटन झाल्यापासून एक महत्वपूर्ण टप्पा गाठताना 15 लाखांहून अधिक पर्यटकांचे स्वागत केले आहे. या वास्तूला 'स्टॅच्यू ऑफ बिलीफ' म्हणूनही ओळखले जाते. भगवान शंकराची 369 फूट उंच मूर्ती भारतातील एक प्रमुख आध्यात्मिक आणि सांस्कृतिक  स्थान बनली असून देशभरातील पर्यटकांना आकर्षित केले आहे.


ही मूर्ती जगातील सर्वात मोठ्या मूर्तींपैकी एक आहे. ही 32 एकरांवर पसरलेली असून याची एकूण उंची 112 मीटर आहे. याची निर्मिती 2.5 लाख घन टन काँक्रीटपासून केली गेली आहे. या मूर्तीचे आयुष्य अंदाजे 250 वर्षे आहे. हे 250 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना तोंड देण्यासाठी आणि भूकंपाच्या झोन आयव्हीमध्येही स्थिर राहण्यासाठी डिझाइन केलेले आहे. या मूर्तीमध्ये 270 फूट आणि 280 फूट उंचीवर गॅलरी आहेत, ज्या काचेच्या पायवाटेने जोडलेल्या आहेत.


पर्यटक 351 फूट उंचीवर जाऊन जलाभिषेक व चरणवंदन करू शकतात. पर्यटक इथे येऊन स्नो पार्क, वॅक्स म्युझियम आणि गेम झोनमध्ये देखील मजा करू शकतात तसेच 'गो कार्टिंग', 'बंजी जंपिंग' (185 फूट), 'झिप लाइन' सारख्या खेळांचा आनंददेखील घेऊ शकतात.


उत्साहात भर घालण्यासाठी येथे 20 फूट उंचीवर एक नवीन अनोखा ३डी अनुभव “आत्ममंथन” लाँच करण्यात आला आहे. या आकर्षणामध्ये प्रत्येकाची स्वतःची खासियत असलेल्या 17 वेगवेगळ्या गॅलरी आहेत. या गॅलरी निसर्गाच्या विविध घटकांनी प्रेरित आहेत. काहींमध्ये 5 तत्वे हवा, पाणी, पृथ्वी, अग्नि, आकाश आणि विश्वविज्ञान यांचे अन्वेषण करण्यात आले आहे. 


काही समुद्रमंथन आणि कल्पतरू वृक्ष यांसारख्या पौराणिक कथांनी प्रेरित आहेत. 'क्रिस्टल टेरेन', 'द कायनेसिस ऑफ बिलीफ' आणि 'ओम बेल' सारख्या गॅलरी प्रगल्भ आणि परिवर्तनशील अनुभव देतात. तर 'कैलास मानसरोवर' आणि 'टनेल टू इटरनिटी' सारख्या गॅलरी आत्मनिरीक्षण आणि ज्ञानाची प्रेरणा देतात आणि परस्परसंबंधाची भावना निर्माण करतात.


मिराज ग्रुपचे संस्थापक मदन पालीवाल म्हणाले, “ही वास्तू जगभरातील पर्यटकांसाठी आध्यात्मिक आणि सांस्कृतिकरित्या महत्व राखत असल्याचा हा पुरावा आहे. आपल्या देशाची मजबूत अध्यात्मिकमुळे आपल्याला केवळ अभ्यागतांना अनोखे आणि एक-एक प्रकारचे अनुभव देत नाहीत तर अभ्यागतांसाठी एक ज्ञानवर्धक अनुभव देखील तयार करतात. मिराज ग्रुपमध्ये आम्ही नेहमीच समाजाला परत देण्यावर विश्वास ठेवतो आणि नाथद्वाराला जागतिक आध्यात्मिक स्थळ म्हणून स्थान देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”