India China Border Live Updates | भारत आणि चीन यांच्या परराष्ट्र मंत्र्याची फोनवरुन चर्चा
चीनने सवयीप्रमाणे पुन्हा एकदा भारतासोबत गद्दारी केली आहे. भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने ही माहिती दिली आहे. 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात ही हिंसक झडप झाली होती. सुरुवातीला तीन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली होती. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार चीनचेही 43 जवान मारले गेलेत किंवा जखमी झाले आहेत.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 17 Jun 2020 08:37 PM

पार्श्वभूमी
नवी दिल्ली : चीनने सवयीप्रमाणे पुन्हा एकदा भारतासोबत गद्दारी केली आहे. भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने ही...More
नवी दिल्ली : चीनने सवयीप्रमाणे पुन्हा एकदा भारतासोबत गद्दारी केली आहे. भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने ही माहिती दिली आहे. 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात ही हिंसक झडप झाली होती. सुरुवातीला तीन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली होती. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार चीनचेही 43 जवान मारले गेलेत किंवा जखमी झाले आहेत.आज सकाळी भारत -चीन सीमेवरील हिंसक झडपेत कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू, जवान पलानी, कुंदन ओझा यांना वीरमरण आल्याचं समोर आलं होतं. चीनच्या या हल्ल्यात एकूण 20 जवान जखमी झाले होते. त्यापैकी 3 जवान सुरुवातीला शहीद झाले होते, मात्र आता लष्कराने दिलेल्या माहितीनुसार भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत.नेमका काय वाद आहे?लडाखमधल्या गैलवान पर्वताजवळच्या प्रदेशात सैन्याच्या जमवाजमवीवरुन हा वाद सुरु झाला. त्याची झळ नंतर लडाखच्या पँगाँग तलावापर्यंत पोहचली. या तलावाच्या आसपास असलेल्या डोंगररांगामध्ये दोन्ही देशांचे फिंगर एरिया ठरलेले आहेत. पण एकमेकांच्या फिंगर एरियात अतिक्रमण केल्यानं वाद पेटला. याआधी भारत-चीनचे 250 जवान एकमेकांसमोर उभे ठाकले, दगडफेक आणि मारामारीत काही जण जखमीही झाले होते.संबंधित बातम्याभारत-चीन सीमावादावर तोडगा निघेल; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रतिक्रिया थ्री इडियट चित्रपटातील रिअल रँचो सोनम वांगचुक यांचं 'बायकॉट मेड इन चायना'चं आवाहन चिनी वस्तू भारतीयांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग, बहिष्काराची मोहीम अपयशी ठरेल; चीनने भारताला खिजवलंMajha Katta बुलेटनी नाही तर वॉलेटनी चीनला चोख उत्तर! सोनम वांगचुक यांच्याशी खास बातचीत | माझा कट्टा
भारत आणि चीन यांच्या परराष्ट्र मंत्र्याची फोनवरुन चर्चा झाली. सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती. दोन्ही देशांच्या शिखर चर्चेत ज्या बाबी एकमताने ठरल्यात, त्याचा दोन्ही देशांनी आदर करावा असं चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यांनी जयशंकर यांना सांगितलं. सध्या आस्तित्वात असलेल्या मार्गानेच दोन्ही देशांनी परस्पर संवाद वाढवावा असंही वांग यांनी सांगितलं.