Vande Bharat Express:  लातूर (Latur)  रेल्वे कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेसची (Vande Bharat Express)  निर्मिती केली जाणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnaw)  यांनी दिली आहे.  दोन वर्षांपूर्वी हा कारखाना सुरू झाला असला तरी कोणत्याही मोठ्या प्रकल्पातील रेल्वे गाड्यांची बांधणी अद्यापही होऊ शकलेली नाही.  मात्र आता वंदे भारतची निर्मिती या कारखान्यात सुरू होणार आहे. लातूरसह चेन्नई, सोनीपत, रायबरेली येथे वंदे भारत एक्सप्रेसची निर्मिती जाणार आहे. 


रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, अमृत भारत योजनेअंतर्गत देशातील 1272 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.  रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, नवी दिल्ली, कानपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, अहमदाबाद आणि लखनौसारख्या मोठ्या रेल्वे स्थानकासह पुरी, जोधपूर, गांधीनगर आणि जयपूरमधील लहान मोठ्या रेल्वेस्थानकांचा कायापलट करण्याच येणार आहे. 


 






बुलेट ट्रेनच्या कामावर यावर्षी विशेष लक्ष


आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत स्वदेशी हायड्रोजन ट्रेनची सुरुवात डिसेंबर 2023 मध्ये करण्यात येणार आहे. या ट्रेनची सुरुवात डिसेंबर 2023 मध्ये करण्यात येणार आहे. ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची ट्रेन आहे. कालका ते शिमला या हेरिटेड सर्किट मार्गावर पहिली हायड्रोजन ट्रेन धावणार आहे. त्यानंतर देशातील प्रमुख पर्यटन ठिकाणांवर ही ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी रामायण सर्किट, जगन्नाथ सर्किट, काशी विश्वनाथ सर्किट अशा अवघड मार्गांवर देखील भारत गौरव ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. या वर्षी बुलेट ट्रेनच्या कामावर विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहिती  रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. 


लातूर कोच फॅक्टरीची वैशिष्ट्ये


लातूर शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर लातूर कोच फॅक्टरी आहे. 350 एकरवरील क्षेत्र आहे. यापैकी 120 एकरवरील पहिल्यापेक्षा बांधकाम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. पहिला फेजमध्ये एका महिन्यात 16 कोच निर्मिती शक्य आहे तर पहिल्या फेज मध्ये वर्षाला 250 कोच, दुसऱ्या फेजमध्ये वर्षाला 400 कोच आणि तिसऱ्या फेज म्हणजे वर्षाला 700 कोच निर्मिती करणारा अवाढव्य कारखान्याच्या पहिल्या फेजची तयार 100 टक्के पूर्ण झाली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात रखडला; भर पत्रकार परिषदेत रेल्वेमंत्र्यांचा थेट आरोप