रोड शोनंतर मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि राहुल गांधी ज्या व्यासपीठावरुन जनतेला संबोधित करणार होते. ते व्यासपीठ अचानक कोसळलं. या घटनेत कोणीही जखमी झाले नसले, तरी एक मोठी घटना टळली.
संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रोड शो संपणार होता. पण गर्दीमुळे हा रोड शो वेळेत पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांना हा रोड शो अर्ध्यावरच समाप्त करावा लागला.
या रोड शोनंतरच अखिलेश यादव आणि राहुल गांधी जनतेला संबोधित करणार होते. पण 5 वाजल्याने ती सभाही होऊ शकली नाहीच, उलट सभेसाठी उभारण्यात आलेलं व्यासपीठ अचानक कोसळलं. पण सुदैवाने त्यावेळी कोणीही दिग्गज नेते तिथं उपस्थीत नसल्याने मोठी दुर्घटना टळली.