पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त करून भारतीय लष्करानं उरी दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय लष्कराच्या या यशस्वी कामगिरीनंतर दिल्लीतल्या घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.
पाकिस्तानच्या संभाव्य प्रतिहल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन सीमेवरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सीमेवरच्या सर्व जवानांच्या सुट्टा रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच सर्जिकल ऑपरेशनच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या नॉर्थ ब्लॉकमध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली. तर लष्कराच्या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षावर होतो आहे.